>> ज्या एटीएममध्ये २००० आणि ५००च्या नव्या नोटा भरण्यात आल्यात, तिथे एटीएमधारकांना २५०० रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा २००० रुपये होती. त्याचप्रमाणे बँकेमध्येही नोटा बदलण्याची मर्यादाही ४००० रुपयांवरून ४५०० रुपये करण्यात आली आहे.
>> हॉस्पिटल, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येतील. वीजबिल, पाणीबिल आणि अन्य सरकारी कर भरण्यासाठीही २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा चालणार आहेत.
>> २४ नोव्हेंबरपर्यंत देशातील सर्व टोल नाके बंद राहतील. एअरपोर्टवरील पार्किंग निःशुल्क.
>> रिझर्व्ह बँकेने एटीएमधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ३० डिसेंबरपर्यंत एटीएम व्यवहारांवर कुठलंही शुल्क न आकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेत.
>> सरकारच्या नव्या आदेशानुसार आता बँकेतून एका आठवड्यात २४ हजार रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा २० हजार रुपये होती.
>> ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग असावी किंवा त्यांची वेगळी व्यवस्था करावी, असे निर्देश सर्व बँकांना देण्यात आलेत.
>> निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला नोव्हेंबर महिन्यात जमा करावा लागत होता. तो त्यांना आता १५ जानेवारी २०१७ पर्यंत जमा करता येईल.
>> किमान तीन महिने जुनं चालू खातं असलेल्या व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांचं वेतन देता यावं यादृष्टीने पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
>> गाव-खेड्यांमध्ये मायक्रो-एटीएमची व्यवस्था करण्यात आली असून एटीएम मशीन अद्ययावत करण्याचं काम वेगानं व्हावं यासाठी उच्चस्तरीय कृती दल नेमण्यात आला आहे.
>> ग्रामीण भागात १.२ लाख बँक प्रतिनिधींसाठी कॅश होल्डिंग लिमिट वाढवून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.
हा निर्णय घेण्याचे कारण काय?
बाजारातील नकली नोटांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मोठ्या दर्शनी मूल्याच्या नोटांचे आहे. त्यातच त्यांचे प्रमाण वाढत चालल्याने अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. नकली नोटा या अगदी खऱ्या नोटांप्रमाणेच दिसतात. त्यामुळे सर्वसामान्यांना खऱ्या आणि खोट्या नोटांमध्ये फरक करणे अवघड होऊन बसते. नकली नोटांचा उपयोग देशविरोधी आणि विघातक कामांमध्ये करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. दहशतवादी कारवायांसाठी आणि काळा पैसा दडविण्यासाठी नकली नोटांच्या रूपात अधिक दर्शनी मूल्य असणाऱ्या नोटा चलनात आणल्या जातात. भारताची अर्थव्यवस्था रोखीने (कॅश) होणाऱ्या व्यवहारांवर आधारीत असल्याने नकली नोटा चलनात असणे, ही एक मोठी समस्या बनली आहे. नकली नोटा चलनात असणे आणि काळा पैसा दडवून ठेवणे या गोष्टींवर अंकुश लावण्यासाठीच केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ५०० आणि १०००च्या दडवलेल्या नोटा बाहेर काढण्यात येणार आहेत.
योजना नेमकी काय आहे?
या योजनेनुसार रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर २०१६पर्यंत जारी केलेल्या पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्यात आल्या आहेत. मंगळवारी जाहीर केलेल्या निर्णयानंतर या नोटा कोणत्याही व्यवहारांसाठी वापरता येणार नाहीत किंवा भविष्यातील कोणत्याही उपयोगासाठी त्यांचा साठा करता येणार नाही. या नोटा
रिझर्व्ह बँकेची देशभरातील १९ कार्यालये, कोणत्याही बँकेच्या शाखा, मुख्य टपाल कार्यालय आणि अन्य छोट्या-मोठ्या टपाल कार्यालयात बदलून देण्याची सोय करण्यात आली आहे.
जुन्या नोटा दिल्यावर मला परत किती मिळणार?
सर्वसामान्य जनतेने त्यांच्याकडील नोटा बँकेत जमा केल्यानंतर त्यांना तितक्याच मूल्याच्या नोटा परत मिळतील.
या नोटा रोख (कॅश) स्वरूपातच मिळणार का?
नाही. तुम्ही कितीही रकमेच्या (५०० आणि हजार) जुन्या नोटा बँकेत जमा केल्यानंतर प्रत्येकाला तूर्त दोन हजार व नंतर चार हजार रुपये इतकीच रोख रक्कम परत मिळणार नाहे. उर्वरित रक्कम मात्र, संबंधिताच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
बदलून मिळणाऱ्या चार हजार रुपयांमुळे माझी अडचण होण्याची शक्यता आहे. मी काय करू?
सध्या करावयाच्या खर्चांसाठी तुम्ही सध्या बँकेच्या खात्यात असणाऱ्या रकमेचा वापर करू शकता. ही रक्कम तुम्ही शक्यतो चेक (धनादेश) आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, आयएमपीएस, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड) वापरावी, असे अपेक्षित आहे.
माझे बँकेत खाते नसल्यास...?
योग्य ती कागदपत्रे दाखवून त्वरित बँकेत खाते उघडावे, हे उत्तम...
जर माझ्याकडे केवळ ‘जनधन’ योजनेतील बँक खाते असेल तर...
ज्यांच्याकडे केवळ ‘जनधन’ योजनेतील बँक खाते असेल, तर अशा व्यक्तींनाही विहित पद्धतीनेच नोटा बदलून घेण्याची संधी प्राप्त होईल.
नोटा बदलण्यासाठी माझ्याच बँकेत जावे लागेल का?
नोटा बदलण्यासाठी कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत आवश्यक त्या कागदपत्रांसह (पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र) तुम्ही जाऊ शकता. तुम्ही कितीही रकमेच्या नोटा बँकेत बदलण्यासाठी दिल्या तरी, तुम्हाला एका दिवसांत चार हजार रुपयेच बदलून मिळतील. त्यापेक्षा जास्त रक्कम पाहिजे असल्यास तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जावे लागेल. खाते नसलेल्या बँकेत जर तुम्ही जाणार असाल, तर तुमची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे बरोबर अवश्य न्या. उर्वरित रक्कम ‘इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर’द्वारे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी त्या खात्याचा तपशील द्यावा लागेल.
माझ्याकडे बँकेचे खाते नाही. मात्र, नातेवाइक किंवा मित्राचे बँकेत खाते आहे. तर, मी त्या माध्यमातून माझ्याकडील नोटा बदलू शकतो काय?
हो नक्कीच... तुम्ही संबंधित खातेधारकाला लेखी परवानगीद्वारे तो अधिकार देऊ शकता.
मी बँकेत व्यक्तिगतरित्या जाणे आवश्यक आहे का? ते शक्य नसल्यास मी माझा प्रतिनिधी पाठवू शकतो काय?
शक्यतो खातेधारकानेच बँकेत जाणे श्रेयस्कर... मात्र, काही कारणास्तव ते शक्य नसल्यास तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवू शकता. मात्र, त्यासाठी त्याच्याबरोबर तुमची लेखी परवानगी आणि अन्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे. शिवाय संबंधित व्यक्तीकडे त्याची ओळखपत्रे असावीत.
मी एटीएमद्वारे पैसे काढू शकतो काय?
तूर्तास तरी नाही... या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून ज्यावेळी १००-१००च्या नोटा एटीएममध्ये टाकण्यात येतील; त्यावेळी तुम्हाला ते काढता येतील. मात्र, १८ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला एकावेळी दोन हजार रुपयेच काढता येतील. १९ नोव्हेंबरनंतर तुम्ही एटीएममधून एकावेळी चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.
मी सध्या विदेशात आहे; काय करू?
जर तुमच्याकडे पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा असतील, तर अधिकृत व्यक्तीची नेमणूक करून ही प्रक्रिया पार पाडू शकता. संबंधित व्यक्ती तुमच्या नोटा बँकेत जमा करू शकेल. मात्र, संबंधित व्यक्तीकडे त्याची ओळखपत्रे (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा ओळखपत्र, पॅन कार्ड, केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र) आणि तुमच्या परवानगीचे पत्र असणे आवश्यक आहे.
मी अनिवासी भारतीय असून, माझ्याकडे एनआरओ खाते आहे. तर मी नोटा बदलू शकतो काय?
होय. तुम्ही जुन्या नोटा तुमच्या एनआरओ खात्यामध्ये जमा करू शकता.
मी विदेशी पर्यटक असून, माझ्याकडे जुन्या नोटा आहेत. मी काय करावे?
त्या नोटांच्या बदल्यात तुम्ही पाच हजार रुपयांपर्यंतचे विदेशी चलन एअरपोर्ट एक्स्चेंज काउंटरवरून विकत घेऊ शकता. नोटांविषयीचे निवेदन जारी झाल्यापासून ७२ तासांच्या आत तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.
या योजनेविषयी मला अधिक माहिती कोठे प्राप्त होईल?
या विषयीची संपूर्ण माहिती रिझर्व्ह बँकेच्या www.rbi.org या वेबसाइटवर, तसेच केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या www.finmin.nic.in या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. या शिवाय तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रण कक्षाशीही ०२२ २२६०२२०१ किंवा ०२२ २२६०२९४४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवू शकता.
गांधीवचने...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पानही आहे. आपल्या लढ्याला नैतिकतेची जोड देत या महात्म्याने स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. म्हणूनच अवघ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला. अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. अगदी नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे आताचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहे. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर महनीय आणि मननीय विचार मांडले. त्यांची विधाने पोकळ नव्हती. त्यात काही विचार होता. म्हणूनच आज जगात ती गांधीजींची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातलीच ही काही वचने....
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल.
देवाला कोणताच धर्म नसतो.
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
'डोळ्याच्या बदल्यात डोळा' या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.


